Monday 22 January 2018

जातीविरहित समाज निर्मितीसाठी

जगात जात फक्त भारतातच आहे, आणि भारतातील राजकारण, समाजकारण व अर्थकारण त्यावर आधारित आहे। समाजात जाती खोलवर रुजल्या व भिनल्या असल्या तरीही योग्य प्रयत्न केल्यास जातीविरहित समाज निर्माण करणे निश्चितच शक्य आहे. याचा उहापोह या लेखात पुढे केला आहे.

Thursday 11 January 2018

न्यूटनच्या शोधांवर पुराणपंथी शिक्षणमंत्र्यांचा हातोडा!

अलीकडे शिक्षणमंत्री हे जोकरगिरी सुद्धा करतात असे दिसून येत आहे. अलीकडेच राजस्थानचे शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी यांनी असेच एक विधान करून वाहवा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. जयपूर येथील राजस्थान विद्यापीठाच्या स्थापना दिवसाच्या निमित्त ८ जानेवारी २०१८ रोजी केलेल्या भाषणात ते म्हणाले, “गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा शोध न्यूटनच्या हजार वर्षे आधी वराहमिहीर या भारतीय शास्त्रज्ञाने लावला. त्यामुळे अभ्यासक्रमात न्यूटनच्या जागी ब्रह्मगुप्ताचे नाव लिहायला पाहिजे.” वृत्तपत्रांनी त्यांचे हे म्हणणे “वादग्रस्त विधान” म्हणून प्रकाशित केले, यातच त्यांच्या विधानाचा फोलपणा दिसून आला.